‘बस्स.. आता तुम्ही निरोप घ्या’; प्रेक्षकांकडून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका बंद करण्याची मागणी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीआरपीच्या शर्यतीत अनेक मालिका चांगला उच्चांक गाठताना दिसत आहेत. यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय वहिनींवरील मालिकांचा समावेश आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हि त्यांपैकी एक मालिका. पहिल्या दिवसापासून या मालिकेचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे. पण गेल्या काही महिन्यांमध्ये मालिकेतील ट्विस्ट आणि कथानकाने घेतलेले वळण प्रेक्षकांच्या डोक्यावर चाललंय. अशातच अलीकडेच मालिकेचा एक प्रोमो व्हायरल झाला होता. जो पाहून प्रेक्षकांनी डोक्याला हात लावत मालिका बंद करा अशी मागणी केली आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या एका प्रोमोवर प्रेक्षकांनी प्रचंड टीका केल्या हायेत. ‘तो लेखक कुठेय..? डोक्यावर पडलाय का..?’, ‘काय फालतूगिरी लावली आहे’, ‘आता हे जरा नाही जरा जास्तचं अती झालंय’, ‘आधी ही मालिका बंद करा’, ‘ हि तर रंग माझा वेगळा मालिकेपेक्षाही जास्त टुकार मालिका आहे’, अशा प्रकारच्या विविध प्रतिक्रिया या प्रोमोवर पहायला मिळाल्या. सर्वाधिक प्रेक्षकांनी हि मालिका बंद करा अशा कमेंट्स केल्याचे दिसले. त्याच झालं असं कि या प्रोमोत, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका ठिकाणी घेऊन जाऊन खड्ड्यात पुरताना दिसत आहेत. यावेळी शालिनी मनातल्या मनात म्हणते की, ‘या टाइमला नशीबाने मला साथ दिली गौरी. जयदीप भावपूर्ण श्रद्धांजली तुला.’

तर दुसरीकडे गौरी जयदीपला शोधत असताना गणपती बाप्पाकडे हात जोडून प्रार्थना करत म्हणते, ‘बाप्पा जयदीपला माझ्यापासून कुठेही घेऊन जाऊ नकोस आणि तितक्यात गौरी तिथेच पडते जिथे जयदीपला पुरलेलं असतं. तिचं मंगळसूत्रही तिथेच पडतं. इथे गौरीला एक छोटी मुलगी येऊन म्हणते, ‘बाप्पाचा उंदीर मामा मार्ग दाखवायला आहे. उंदीर मामा तुचं गौरीला आता मार्ग दाखवं बरं आणि तिचे एक छोटा पांढरा उंदीर येतो’. हा भाग नुकताच प्रसारित झाला असून ‘बस्स झालं.. हि मालिका बंद करा’, ‘अरे काय ही मालिका… किती वेळा जयदीप मरतो आणि किती वेळा जीवंत होतो…फालतू’, ‘कदाचित या मालिकेमधील लोकांना काम मिळत नाही म्हणून चालू ठेवली आहे. कारण एवढ्या घाण मालिकेत हे सगळे बिनडोक काम करत आहेत. अर्थहीन मालिका आहे’, अशा प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. त्यामुळे या मालिकेवर आता बंदची टांगती तलवार लटकण्याची शक्यता नाकारता येत नाही.