‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी…’; मिलिंद गवळींच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. विविध पोस्ट शेअर करताना ते कायम स्वतःचे अनुभव, किस्से शेअर करत असतात. मिलिंद गवळी यांनी आतापर्यंत चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अस्खलित अभिनयाने कायम प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अलीकडेच मालिकेत लेकीच्या लग्नावेळी अनिरुद्ध साकारताना पुन्हा एकदा मिलिंद गवळी यांनी मन जिंकलं आहे. दरम्यान कलाकार आणि वेळ, शिस्त याच्याशी संबंधित त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये बॉलिवूडच्या काही कलाकारांचे त्यांनी आवर्जून नाव घेतले आहे.

यात मिलिंद गवळींनी लिहिलंय, ”’असेल हरि तर देईल खाटल्यावरी” किंवा “नशिबात असेल तर मला मिळेल” असं म्हणून चालत नाही. स्वतःला हात पाय हलवावेच लागतात, कष्ट करावे लागतात, जे काही ध्येय गाठायचं असेल, त्या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावं लागतं, आणि असं नाहीये की कोणाला नशिबाने मिळत नाही, किंवा हरी खटल्यावर देत नाही, पण जे काही कष्ट न करता मिळालेलं असतं ते फार काळ टिकतही नाही असा माझा अनुभव आहे, कष्ट करून मिळवण्याचा आनंद खूप वेगळाच असतो, आणि कष्ट करणे म्हणजे अगदी गदा मजदूरी करणे असे ही नाही, कष्ट करण्यामध्ये प्रामाणिकपणा असणं फार गरजेचे आहे’.

‘कष्ट करणे म्हणजे दिलेल्या वेळा पाळणे, यालाही खूप महत्त्व आहे, punctuality हा शब्दच बऱ्याचशा लोकांच्या dictionary मध्येच नसतो. आणि असं नाहीये की त्यांना यश मिळत नाही, मिळतं त्यांना पण यश मिळतं, खूप यश मिळतं, Punctual नसणारे आणि indiscipline कलाकार उदाहरणार्थ राजेश खन्ना, गोविंदा, शत्रुघन सिन्हा आणि disciplined, punctualmकलाकारांमध्ये अमिताभ बच्चन च नाव घेतलं जातं शशि कपूरचं नाव घेतलं जातं नंतरच्या पिढीतले आमिर खान, अक्षय कुमार यांचं नाव घेतलं. तुमचं जर तुमच्या कामावर प्रेम असेल तर तुम्हाला , तुमचं काम कष्टाच वाटत नाही, एकदा मला अशोक सराफ म्हणाले होते. की ज्या वेळेला सकाळी उठल्यानंतर मला असं वाटेल “अरे यार आज शूटिंग आहे” शूटिंगचा मला कंटाळा येईल, त्यादिवशी मी काम करायचं थांबवेन, आणि खरंच मला तर सकाळी पाच वाजता उठल्यावर शूटिंग करायचा उत्साह आसतो , अगदी फिल्मचं किंवा सिरीयलचे शूटिंग असायला पाहिजे असं काही नाही अगदी मग हे आजचं आशय बरोबरच फोटोशूट असलं तरी तो उत्साह काही कमी होत नाही’.

मिलिंद गवळी यांनी शेवटी लिहिलंय, ‘तसाच उत्साह, तीच positive energy cameraman आशय मध्ये असते, सगळी अरेंजमेंट करणारा श्री मध्ये असते,
दर्शना हजारे शानबाग ने तयार केलेले Costumes press iron करणारा संकेत मध्ये असते, मेकअप करणारा समीर म्हात्रे मध्ये, रुक्सार आणि राजू मध्ये असते, या सगळ्यांची collective, strong, positive energy, magic create करत असते. मग डोक्यावर कडक ऊन असलं तरी, घामाच्या धारा वाहत असल्या तरी, शूटिंग करत असताना मनावर थंड वाऱ्याची झुळूक स्पर्श करत असते असंच वाटतं !’