नुसता येड्याचा बाजार..!! ‘त्या’ रीलवरून नारकर जोडपं झालं ट्रोल; Insta’वरून हटवला व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, नाटकं आणि चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत गेली अनेक वर्ष अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात आणि वेगवेगळ्या ट्रेंडिंग गाण्यांवर दोघे मिळून रिल्स करताना दिसतात.

अलीकडेच ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणे प्रचंड ट्रेण्डिंगमध्ये आहे आहे. यावर अनेक नेटकरी व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. नारकर जोडप्यानेही या गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आणि ट्रोलिंगचे शिकार झाले.

https://www.instagram.com/p/CxNItumNAtg/?utm_source=ig_embed&utm_campaign=invalid&ig_rid=3e45cec2-210d-4ba0-95cf-0a8ab7b8b0fc

नारकर जोडपे हे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असणारे जोडपे आहे. त्यांचे अनेक रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा त्यांच्या रिल्सवर नेटकरी दोघांचे कौतुक देखील करतात. पण यावेळी मात्र नेटकऱ्यांनी टीकांचा वर्षाव केला आहे. एका शाळकरी मुलाने अतिशय सुंदर एक्स्प्रेशन्ससह म्हटलेलं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गाण्याने प्रत्येकाला वेड लावलंय. गाणं ट्रेंडिंगमध्ये येताच नारकर जोडपं काही स्वतःला थांबवू शकलं नाही आणि त्यांनी या गाण्यावर रील बनवली.

नारकर जोडप्याचा या गाण्यावरील डान्स पाहून नेटकऱ्यांची अशी काही सटकली कि त्यांनी या जोडप्याला चांगलंच ट्रोल केलं. ‘नारकर अहो आता बस्स करा, तुमचे ते तेच तेच एक्सप्रेशनवाले व्हिडिओ पाहून कंटाळा आला’, ‘डोकं फिरलंय का तुमचं..?’, ‘अरे हा काय बालिशपणा आहे..’, ‘वेड्याचा बाजार आहे नुसता’, अशा प्रतिक्रियांनी कमेंट बॉक्स भरून गेला होता. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहून अखेर हा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर हटवला आहे. यानंतर मात्र नेटकऱ्यांची आगपाखड थांबली आहे.