मी मुलगा का नाहीये..? अभिनेत्री ऋतुजा बागवेचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री ऋतुजा बागवेने भक्कम स्थान निर्माण केले आहे. आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये कुठे ना कुठे ऋतुजा बागवेच्या नावाचा समावेश आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे तिचा एक मोठा असा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. अलीकडेच एका मुलाखतीत ऋतुजाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही वक्तव्य केली आहेत. जी प्रचंड चर्चेत आहेत आहेत.

सध्या ऋतुजा तिचा नवा चित्रपट ‘अंकुश’मूळे चर्चेत आली आहे. यानिमित्त तिने एका युट्यूब चॅनलला मुलाखत देतेवेळी आपल्या मनातील एक खंत बोलून दाखवली आहे. ऋतुजा म्हणाली कि, ‘मला वाईट वाटतं की मी मुलगा का नाहीये..? जर मी मुलगा असते तर मलाही चित्रपटात अॅक्शन सीन्स करता आले असते’. ऋतुजाचं हे विधान चांगलंचं चर्चेत आलं असून तिचे चाहते यावर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी तिला ऍक्शन रोल्स करण्यासाठी समर्थन दिलं आहे.

https://www.instagram.com/reel/Cx7qmTiyt1f/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

काही दिवसांपूर्वीच ऋतुजाने मुंबईत तिचं हक्काचं नवं घर घेतलं आहे. तिच्या गृहप्रवेशाचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत तिने चाहत्यांसोबत आपला आनंद शेअर केला होता. शिवाय ऋतुजाचा नवा चित्रपट ‘अंकुश’ अलीकडेच ६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ऋतुजा बागवेबरोबर केतकी माटेगावकर, स्वप्नदीप घुले, सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे, चिन्मय उदगीरकर, मंगेश देसाई, शशांक शेंडे, गौरव मोरे, नागेश भोसले, पूजा नायक यांच्या मुख्य भूमिका आहेत.