‘मालिकेचा प्रवास जरी संपला असला तरी…’; ‘दार उघड बये’ मालिकेला निरोप देताना अभिनेता भावुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘दार उघडं बये’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील मुख्य भूमिकेत असणाऱ्या मुक्ता आणि सारंगच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. अन्य कलाकारांच्या भूमिकेने देखील प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केल आहे. या मालिकेत अभिनेता अमोल नाईकदेखील एका महत्वाच्या भूमिकेत होते. त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे नाव सुनील असे होते. या पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिल्यानंतर मालिकेला निरोप देताना अमोल भावुक झाला आहे.

अमोलने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘दार उघडं बये, दार उघड बये या मालिकेचा प्रवास परवा संपला. तुम्ही रसिक प्रेक्षकांनी या मालिकेवर खूप प्रेम केलं. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळेच या मालिकेने एक चांगला टप्पा ओलांडून तुम्हा सर्वांचे मनोरंजन केले. मी trumpcardproduction आणि @zeemarathiofficial यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या मालिकेचा एक भाग बनण्याची संधी दिली. या मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली, सुरुवातीला काम करत असताना खूप दडपण होतं की एवढ्या मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत काम कसं होईल पण सगळे इतके छान की या फॅमिली मध्ये कधी रमलो ते कळालंच नाही’.

‘दार उघड बये या मालिकेचा प्रवास जरी आता संपला असला तरी पुढे याच टीम सोबत नक्की परत दुसऱ्या एका मालिकेचे दार नक्की लवकर उघडेल आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी कायम मिळतचं राहील. बाकी पुन्हा एकदा संपूर्ण दार उघड बये टीमचं मनापासून आभार खूप छान अनुभव तुमच्या सोबत काम करत असताना मिळाला आणि असेच पुढे परत एकत्र काम करतच राहू आणि भेटचं राहू’. अमोलच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत मालिका बंद झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.