हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (sukh mhanje nakki kay asta) स्टार प्रवाह हि अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग ठरल्या आहेत. अनेक मालिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. तर काही मालिकांच्या रटाळ कथानकाकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ वळवली आहे. अनेकदा मालिकांचे कथानक पुढे गेल्यावर त्यातील ट्विस्ट प्रेक्षकांच्या नाराजीचे कारण ठरतात. असेच काहीसे ‘सुख म्हणजे नक्की काय असत‘ या मालिकेबाबत घडलं. अशातच आता हि मालिका लवकरच बंद होणार असल्याचे समोर आले आहे. ज्याबाबत प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अनेक मालिका टीआरपी मिळत नसल्यामुळे बंद कराव्या लागल्याचे समोर आले आहे. तर काही मालिकांचे कथानक संपले. (sukh mhanje nakki kay asta) तर काही मालिकांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे मालिका बंद कराव्या लागत आहेत. यांमध्ये ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचा समावेश झाला आहे. येत्या २० नोव्हेंबरपासून ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवी मालिका स्टार प्रवाहवर रात्री ९.३० वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ हि मालिका निरोप घेणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
सध्या ज्या वेळेत ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका सुरु आहे त्या वेळेत आता ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका सुरु होणार आहे. त्यामुळे नव्या मालिकेच्या येण्याचा आणि जुनी मालिका बंद होण्याचा आनंद प्रेक्षकांनी व्यक्त केलाय. एका नेटकाऱ्याने म्हटले, ‘बरं झालं सुख म्हणजे नक्की काय असतं संपत आहे’, तर आणखी एकाने लिहिलं, ‘अखेर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ संपत असल्यामुळे सुख मिळालं एकदाशी’, (sukh mhanje nakki kay asta) अन्य एकाने म्हटले, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचा शेवट होणार हे ऐकून बरं वाटलं.. खूप कंटाळा आला होता, तोच तोच ड्रामा बघायला.. देवचं पावला’. मात्र अद्याप वाहिनीने याविषयी स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ही मालिका ऑफ एअर होणार की नव्या वेळेत पाहायला मिळणार? हे लवकरच स्पष्ट होईल.