स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजनाच्या दुनियेत मालिकांचे एक विशेष स्थान आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनात मनोरंजनाचे महत्वपूर्ण माध्यम म्हणून मालिकांकडे पाहिले जाते. आजच्या घडीला नीट पाहिले तर अनेक वाहिनींवरील मालिका लोकप्रिय आहेत. ज्यामध्ये स्टार प्रवाहच समावेश आहे. या वाहिनीवरील प्रत्येक मालिकेचे कथानक प्रेक्षकांच्या पसंतीचे कारण ठरले आहे. असे असताना स्टार प्रवाह वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका बंद होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता अक्षर कोठारी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेची जोरदार चर्चा सुरू आहे. हि मालिका येत्या २० नोव्हेंबर २०२३ पासून रात्री ९.३० वाजता प्रसारित होणार आहे. सध्या या मालिकेच्या वेळेत ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही लोकप्रिय मालिका सुरू आहे. त्यामुळे आता ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेचे स्वागत करताना जयदीप- गौरीला निरोपाचा नारळ द्यावा लागणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

अशातच आता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका नव्हे तर दुसरीच मालिका ऑफ एअर जाणार असल्याचे समोर आले आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, स्टार प्रवाहवरील एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या मालिकेच्या वेळेत १० वाजता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रसरती होणार आहे. तरीही अद्याप अधिकृतरित्या स्टार प्रवाह वाहिनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. चालू चर्चांनुसार, ‘ठिपक्यांची रांगोळी’ खरंच निरोप घेणार का..? हे लवकरच कळेल.