जयदीप- गौरीचा पुनर्जन्म होणार..; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कथानक 25 वर्षांनी पुढे सरकणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. मालिकेचे कथानक इतक्या वेगळ्या पद्धतीने पुढे जात आहे कि पाहून प्रेक्षकांमध्ये पुढील भागांबाबतची उत्सुकता आणखीच वाढते आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार..? याबाबत चर्चा सुरु असताना नुकताच याचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. ज्याप्रमाणे मालिकेचे कथानक थेट २५ वर्षांनी पुढे सरकणार आहे. शिवाय जयदीप आणि गौरी यांचा पुनर्जन्म देखील दाखवण्यात येणार आहे.

आतापर्यंत मालिकेत शालिनीने षडयंत्र करुन जयदीप आणि गौरी यांच्या प्रेमाचा शेवट केल्याचे आपण पहिले. गौरी आणि जयदीपचे आयुष्य संपवून शालिनीने तिचा डाव पूर्ण केला आहे. मालिकेचे हे भाग पाहून प्रेक्षकांची ही लाडकी जोडी कायमचा निरोप घेणार असे वाटले होते. पण खऱ्या प्रेमाचा कधीच अंत होत नाही म्हणत मालिकेत जयदीप- गौरीच्या पुनर्जन्माचा नवा अध्याय सुरु होत आहे. आता २५ वर्षांनंतर जयदीप आणि गौरी हे अधिराज आणि नित्या या नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे आता अधिराज आणि नित्याची प्रेमकहाणी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

आता मालिकेच्या पुढील कथानकात जयदीप- गौरीच्या पुनर्जन्माची गोष्ट पहायला मिळणार आहे. या पुढील कथेत अनेक रहस्यांचा उलगडादेखील होणार आहे. इतकेच नव्हे तर मालिकेत आता काही नवीन पात्र पहायला मिळतील. जयदीप-गौरीचा जीव घेणाऱ्या शालिनीला तिच्या पापांची शिक्षा आई अंबाबाई कशी देणार..? जयदीप- गौरीची लेक लक्ष्मी कुठे असेल..? नित्या- अधिराजची भेट कधी होणार..? ते शिर्के पाटलांच्या घरी कधी येणार..? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पुढील भागांमध्ये मिळणार आहेत. दरम्यान मालिकेचा नवा प्रोमो आणि त्यामध्ये वर्षा उसगांवकर यांचा दाखवलेला लूक पाहून पुढील भागांबाबतची उत्सुकता वाढली आहे.