अर्जुन- सायलीच्या लग्नाचं सत्य कल्पनाला समजणार..? मालिकेच्या नव्या प्रोमोने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेने नुकते ३०० भाग पूर्ण केले आहेत. अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची माने जिंकली. मालिकेचे कथानक, मालिकेतील पात्र, रंजक ट्विस्ट हे या मालिकेला मिळणाऱ्या प्रतिसादाची कारणे आहेत. या मालिकेतील अर्जुन- सायलीची जोडी प्रेक्षकांना फार आवडते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या बंधनात अडकूनही ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. वेळोवेळी अर्जुन आणि सायली त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरिजबाबत लपवालपवी करताना दिसतात. पण आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.

आतापर्यंत आपण पाहिलं कि, अस्मिताने सायलीला त्रास देण्यासाठी आणि घरच्यांसमोर खोटं पाडण्यासाठी ती गरोदर असल्याचं सर्वांना सांगितलं. पण, अर्जुनने त्याच्या हुशारीच्या जोरावर अस्मिताचा भांडाफोड केला आणि कुटुंबीयांसमोर सायली गरोदर नसल्याचे सत्य समोर आणले. यामुळे पूर्णा आजी आणि कल्पनाच्या मनात सायलीबद्दल सहानुभूती निर्माण झाली. तर अस्मिताने आता सूड घेण्याचे ठरवले आहे. दरम्यान मालिकेत आता दिवाळीचा सिक्वेन्स सुरु झाला आहे.

अस्मिताच्या नव्या प्लॅननुसार कल्पना अर्जुन- सायलीच्या खोलीची साफसफाई करायला जाते. ज्या खोलीत सायलीची वैयक्तिक डायरी आणि अर्जुन- सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरिजचे डॉक्युमेंट असतात. त्यामुळे आई खोलीची साफसफाई करायला गेल्याचे कळताच दोघे घाबरून जातात. दोघेही खोलीच्या दिशेने धावत जातात आणि पाहतात कि, कल्पनाच्या हातात लाल फाईल असते. हा प्रोमो पाहून कल्पनाला अर्जून आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच सत्य कळेल असे वाटत आहे. आता खरंच असं घडेल का.? याचा उलगडा ११ नोव्हेंबरच्या भागात होणार आहे.