‘कधी कधीतर मीच नको होऊन जातो स्वत:ला…’; काय झालंय कुशलला..?


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक शो चला हवा येउद्याच्या माध्यमातून अभिनेता कुशल बद्रिके हा नेहमीच हास्याचे नवनवे तरंग घेऊन येतो. विविध पात्र साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कुशल एक उत्तम अभिनेता आहे यात काहीच शंका नाही. मात्र त्याच्या अभिनयाइतकीच धार तिच्या लेखणीला आहे हे तो वारंवार सिद्ध करत आहे. सुकून या नावाने तो सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. त्याने शेअर केलेल्या पोस्टमधील प्रत्येक शब्द हृदयाला स्पर्श करतो.

अलीकडेच काही दिवसांपूर्वी अभिनेता कुशल बद्रिकेने स्वतःचा एक फोटो शेअर करत एक लक्षवेधी कॅप्शन शेअर केले होते. चहाचा कप… आणि निसर्गाकडे एक टक पाहत कुशलचा हा फोटो त्याच्या बैचेन मनाचा जणू पुरावाच देत आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये कुशलने लिहिलंय कि, ‘कधी कधी नकोशी होते गर्दी, कधी कधीतर मीच नको होऊन जातो स्वत:ला. (सुकून)’. कुशलची हि पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यावर बऱ्याच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या पोस्टवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘जीवनात एकटे राहता आले पाहिजे’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘तस्विर की कहानी लफ्जों में बयान नहीं होती’. याशिवाय आणखी एका युजरने लिहिले आहे कि, ‘दर्द है लाईन में’. तसेच अन्य एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले आहे कि, ‘शेवटी जग हे अनोळखीच असते’. तर आणखी एका युजरने शायराना अंदाजात लिहिलंय, ‘मुझे इस भीड़ में लगता है ऐसा कि मैं ख़ुद से बिछड़ के रह गया हूँ…!!’