‘सायलीची दिवाळी अर्जुन स्पेशल करणार… सुभेदारांच्या घरी मधूभाऊ येणार’; मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ हि मालिका अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. शिवाय मालिकेतील ट्विस्ट हे पाहण्याजोगे असतात. मालिकेतील रस वाढविण्यासाठी हि रंजक वळणे कामी येतात. मालिकेत कॉन्ट्रॅक्ट मॅरिजच्या बंधनात अडकलेले सायली आणि अर्जुन यांचे नाते आता अनोख्या वळणावर येऊन ठेपले आहे. अशातच दिवाळी पाडव्यानिमित्त अर्जुनने सायलीला एक खास भेट दिली आहे. जयचा प्रोमो व्हायरल झाला आहे.

मालिकेत दिवाळीचा सिक्वेन्स सुरु आहे. त्यानुसार सायली आणि अर्जुनच्या पहिला दिवाळ सण सुभेदार कुटुंबीय साजरा करत आहेत. येत्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना नक्कीच नवे ट्विस्ट पहायला मिळणार आहेत . दरम्यान मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये येत्या भागात मालिकेत प्रतिमा आणि मधूभाऊंची एंट्री होणार असे दिसत आहे. सुभेदारांच्या घराजवळ लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर प्रतिमा आली असून ती कोणाच्याही नकळत तिचं लक्ष्मीचं नाणं रांगोळीवर ठेवून निघून जाते. दरम्यान सायलीला आपल्या आईची चाहूल जाणवते. कोणीतरी जवळची व्यक्ती घराजवळ येऊन गेल्याची जाणीव तिला होते.

पूर्णा आजीला प्रतिमाने ठेवलेलं सोन्याचं नाणं सापडतं आणि ती माझी प्रतिमा इथे येऊन गेली असं सगळ्यांना सांगते. लक्ष्मीपूजन पार पडल्यावर पाडव्याच्या निमित्ताने अर्जुन सायलीला खास सरप्राईज देण्यासाठी आश्रमातील मुलांना तिला घरी आमंत्रित करतो. सगळ्या मुलांना भेटून सायलीला आनंद होते आणि इतक्यात मधुभाऊ देखील येतात. अर्जुन चैतन्यच्या मदतीने मधूभाऊंची काही काळ सुटका करून घेतो आणि त्यांना भेटून सायली भावुक होते. यावेळी अर्जुन ‘मिस सायली हेच तुमचं दिवाळी पाडव्याचं गिफ्ट आहे’, असं म्हणतो. तर सायली अर्जुनचे आभार मानते आणि ‘तुमचे हे उपकार मी केव्हाच नाही विसरणार’, असे म्हणते.