‘मॅडहेड देवकी’ला निरोप देताना भावुक झाली अभिनेत्री; म्हणाली, ‘ती माझ्याबरोबर नेहमी राहील..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचं कथानक आता २५ वर्ष पुढे गेलं आहे. ज्याची सुरुवात आजपासून होणार आहे. मालिकेत आता गौरी- जयदीपच्या पुनर्जन्माची कथा दाखवण्यात येईल. याचे प्रोमो गेल्या काही आठवड्यांपासून व्हायरल होत आहेत. मालिकेच्या या नव्या पर्वात जुन्या पर्वातील काही कलाकार मात्र दिसणार नाहीत. यामध्ये माधवी निमकर, कपिल होनराव, अर्पणा गोखले, गणेश रेवडेकर, भक्ती रत्नपारखी यांचा समावेश आहे. नुकतीच भक्तीने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने या मालिकेत मीनाक्षी राठोडला रिप्लेसमेंट दिली होती. तिच्या भूमिकेचं नाव देवकी असं होतं.

या पोस्टमध्ये भक्तीने लिहीलंय, ‘ ”मॅडहेड” देवकी माझ्याबरोबर नेहमी राहील… आज माझा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधला शेवटचा एपिसोड…पण हे सुख माझ्याबरोबर नेहमी राहील…मी कोणाची तरी रिप्लेसमेंट केलेलं हे माझं पहिलं पात्र…ते ही इतकं महत्त्वाच आणि गाजलेलं…ज्यात मी कधीच बोलले नाही ती भाषा मला बोलायची होती…खूप वेगळ्या शेड्स होत्या…पण ते करताना मला सगळ्यात मोठी मदत झाली ती अर्थातच आमचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे सर…त्यांनी सुरुवातीला आणि अगदी शेवटपर्यंत माझा आत्मविश्वास वाढवला…’

मला देवकी सापडायला मदत केली..त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने अभिनेत्री म्हणून मला खूप छान घडवलं आहे, खूप शिकवलं आहे…आणि ही गोष्ट माझ्याबरोबर नेहमी राहिल..चंदू सर खूप धन्यवाद…तुमच्या बरोबर काम करायची संधी मला नेहमी मिळू देत… तुम्ही ग्रेट आहेत. आमची पूर्ण दिग्दर्शनाची टीम, कॅमेरा टीम, मेकअप आणि हेअर टीम, स्पोट दादा…सगळ्यांना खूप खूप धन्यवाद…माधुरी मॅम, अमेय तुमच्याशिवाय हे शक्‍य नव्हतं…कोठारे व्हिजनबरोबर काम करायची ही फक्त सुरुवात आहे…अजून खूप चांगलं काम आपल्याला करायचं आहे…’.

पुढे अभिनेत्रीने लिहीलं, “माझे सगळे सहाय्यक कलाकार…तुमच्याशिवाय मी देवकी एन्जॉय करू शकले नसते…धन्यवाद…सगळ्यांवर एक एक वेगळी पोस्ट लिहायला पाहिजे एवढे सगळे ग्रेट आहात आणि एवढे माझ्या जवळचे झाला आहात….तुम्हा सर्वांना खूप सारं प्रेम….स्टार प्रवाह चॅनेलवर काम करायला मिळाल यासाठी मी खूप भाग्यवान आहे…धन्यवाद…तुम्ही माझ्यावर विश्‍वास ठेवतात त्याबद्दल…अशीच संधी मला नेहमी मिळेल याची खात्री आहे…आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सगळे माझे प्रेक्षक…मला देवकी म्हणून स्वीकारलं…माझ्यावर प्रेम केलंत…माझा आत्मविश्वास वाढवला…कारण तुमच्याशिवाय मी हे करूच शकले नसते..’

‘मी आले तेव्हा देवकी हे पात्र मालिकेमध्ये खूप जुन होतं..खूप हिट होतं..त्याची रिप्लेसमेंट करणं माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता…माझी कोणाबरोबर स्पर्धा नव्हती…ती असेल तर फक्त माझीच माझ्याबरोबर होती…मला ते पात्र समजून घ्यायला तुम्ही वेळ दिला…त्यासाठी खूप खूप धन्यवाद…असेच प्रेम राहूदेत..कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही कलाकार आहोत…तुमचं मनोरंजन करायची संधी मला अशीच मिळत राहू देत…लवकरच भेटूयात एका नवीन भूमिकेत..”