‘पत्नीया कितना भी काजू- बदाम खाये..’; महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड आणि मराठी सिनेविश्वात स्वतःची एक वेगळी छाप पाडणारी बहुचर्चित जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख. रितेश आणि जिनिलियाने २०१२ साली लग्न केले आणि आपल्या संसाराला सुरुवात केली. आज ११ वर्ष होऊनही त्यांच्यातील प्रेम तितकाच ताजं आणि बहरणारं आहे. आजही ते वेळोवेळी एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. त्यात रितेश आणि जिनिलिया दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्यामुळे विविध पोस्ट शेअर करून लक्ष वेधून घेतात.

रितेश आणि जिनिलीया दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. नेहमीच विविध लूक मधील फोटो आणि मजेशीर व्हिडीओ हे जोडपं शेअर करत असते. दैनंदिन आयुष्यावर आधारलेले आणि व्हायरल होणारी गाणी तसेच संवादांवर ते व्हिडीओ बनवत असतात. सध्या रितेशने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. रितेश देशमुखने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. जो फारच मजेशीर आहे.

रितेशने इंस्टाग्रामवरील एका मजेशीर ऑडिओवर व्हिडीओ बनवला आहे. या मजेशीर ऑडिओमध्ये रितेश म्हणतोय, ‘पत्नीया कितना भी काजू- बदाम खाये, पिस्ता आदमी ही हैं।’ या व्हिडीओमध्ये रितेशच्या मागे जिनिलीया दिसतेय जी काजूचे पॉकेट खोलताना दिसत आहे. रितेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओला लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, रितेश देशमुखने अलीकडे त्याच्या बहुचर्चित ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाची घोषणा केली. तर जिनिलीयाचा ‘ट्रायल पीरियड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.