अप्रतिम अनुभव! मी 1 वर्ष या मालिकेचा भाग होते..; प्रेक्षकांचा निरोप घेताना अश्विनी झाली भावुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधून अनघा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेने तिच्या अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अश्विनी एक उत्तम अभिनेत्री आणि एक समाजभान जपणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. अश्विनीने नुकतीच सोशल मीडियावर आपल्या मालिकेकच्या शेवटच्या भागाचा उल्लेख करत मालिका संपल्याचे सांगितले आहे. हि पोस्ट पाहून नेटकऱ्यांना असे वाटू शकते कि ‘आई कुठे काय करते’ हि मालिका निरोप घेत आहे. पण तसं नाहीये. तर कसं आहे..? हे जाणून घेऊया.

अभिनेत्री अश्विनी महांगडे हि सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. त्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ आणि आपल्या प्रोजेक्ट्सची माहिती ती सोशल मिडीयाच्यामाध्यमातून देत असते. नुकतीच तिने आपल्या मालिकेने निरोप घेतल्याची माहिती देखील सोशल मीडियावरचं शेअर केली आहे. सुरुवातीला वाचताना चाहत्यांना असे वाटू शकते कि, ‘आई कुठे काय करते’ ही मालिका संपणार आहे. पण असे नसून अश्विनी काम करत असलेली ‘मेरे साई’ ही मालिका ऑफ एयर जाते आहे. त्यानिमित्त अश्विनीने सोशल मिडीयावर एक भावुक पोस्ट शेअर आहे.

यामध्ये अश्विनीने लिहीलंय, ‘.. मेरे साई…… (अप्रतिम अनुभव) परवा या हिंदी मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवून या मालिकेने समारोप केला. मी साधारण 1 वर्ष या मालिकेचा भाग होते. तसे पाहता ही माझी पहिली हिंदी मालिका. खरे तर शब्द उच्चाराचे, पाठांतर होईल न, मला जमेल न अशा अनेक गोष्टींचे दडपण हे होतेच. मी प्रयत्न केले. तेजस्वीला मी स्वीकारले आणि तिने मला. दशमीची आभारी आहे की मला एवढी मोठी संधी दिली. तसे पाहता निर्मिती संस्था, सहकलाकार, लेखक, संकलन विभाग, रंगभूषा, केशभूषा, वेशभूषा संगीत विभाग, स्पॉट बॉईज आणि रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत सगळेच किती आणि कसे आभार मानायचे. मी कायम ऋणी राहीन’.