झी मराठीची ’36 गुणी जोडी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप; कलाकारांच्या पोस्टने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यातील काही मालिका केवळ टीआरपी कमी असल्यामुळे किंवा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद करण्यात आल्या. त्यामुळे या मालिकांचे कथानक पूर्ण होऊ शकले नाही. तर काही मालिका मात्र कथानक पूर्ण झाल्यानंतर प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसल्या. दरम्यान झी मराठीवरील आणखी एक मालिका आता ऑफ जाणार असल्याचे समोर आले आहे. हि मालिका म्हणजे ‘३६ गुणी जोडी’.

‘झी मराठी’वरील ‘३६ गुणी जोडी’ ही लोकप्रिय मालिका आता लवकरच निरोप घेणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेची वेळ बदलण्यात आली होती. त्यानुसार हि मालिका दुपारी २ वाजता प्रसारित केली जात होती. ज्यासाठी प्रेक्षकांनी विरोध दर्शवला. मध्यंतरी हि मालिका बंद होणार असेही समोर आले होते. ज्याला प्रेक्षकांनी कडकडून विरोध करत वहिनीला हि मालिका सुरु ठेवण्यास भाग पाडले. त्यामुळे झी मराठीची ही मालिका आजपासून म्हणजेच ४ डिसेंबरपासून आधीच्या वेळेत रात्री ११ वाजता प्रसारित करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला. अशातच आता ही मालिका लवकरच ऑफ एअर होणार असल्याचे समोर आले आहे.

या मालिकेतील वेदांत म्हणजेच अभिनेता आयुष्य संजीव आणि सार्थक म्हणजे अभिनेता सागर कोरडे यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शूटिंग सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. सोबत शेअर केलेल्या पोस्टवरून हि मालिका अखेर निरोप घेणार आहे हे अधिकृतरीत्या समोर आले आहे. आयुष्यने वीडब्ल्यू इन्फ्राच्या त्याच्या केबिनमधले फोटो शेअर करत लिहिलं, ‘वेदांतच्या केबिनमधले शेवटचे काही क्षण! यामध्ये सर्वात जवळची होती वेदांची खुर्ची. जिने मला खूप धैर्य, धडे आणि सुंदर आठवणी दिल्या. मला या खुर्चीची आणि वीडब्ल्यू इन्फ्राची कायम आठवण येईल’. तर सागरनं लिहिलं, ‘सांगायला थोडं कठीण जातंय, पण सार्थकचा प्रवास इथे संपतोय… मायबाप रसिकप्रेक्षक, झी मराठी आणि सेवेंथ सेन्स मीडिया परिवाराचे मनापासून खूप खूप आभार…लवकरच भेटुयात…’