‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेत्याचा शुभविवाह संपन्न; लग्नातील फोटो शेअर करत म्हणाला, ‘माझे प्रेम, माझा जोडीदार…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या वर्षातील शेवटचे काही मुहूर्त बाकी असताना अनेकांच्या घरी लगीनघाई दिसत आहे. यामध्ये काही मराठी कलाकार देखील आहेत ज्यांनी आपला लाईफ पार्टनर निवडला असून लग्नसुद्धा उरकलं आहे. अलीकडेच प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख हे लोकप्रिय जोडपं लग्न बंधनात अडकलं आहे. शिवाय सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांनीदेखील गुपचूप लग्न उरकलं. यातच आता आणखी एक अभिनेता लग्न बंधनात अडकल्याचं समोर आलं आहे.

लोकप्रिय ठरलेली मराठी मालिका ‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता विनम्र भाबलने ८ डिसेंबर २०२३ रोजी लग्न केल्याचे समोर आले आहे. विनम्रने ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत ‘सत्तू’ ही भूमिका साकारली होती. जी चांगलीच लोकप्रिय ठरली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. तर प्रेक्षकांच्या लाडक्या सत्तूने म्हणजेच विनम्रने त्याची लाइफ पार्टनर शोधली आणि लग्न करून संसाराला सुरुवात केली आहे. विनम्रच्या पत्नीचे नाव ‘पूजा’ असे आहे. विनम्रचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात पार पडले आणि यावेळी मालिकेतील कलाकार मंडळी उपस्थित होती.

विनम्रने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘तुझ्यात मला माझे प्रेम, माझा जोडीदार, माझा चांगला मित्र सापडला… धन्यवाद!!’ विनम्रच्या लग्नसोहळ्याला ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळेसह रिना मधुकर, पूर्णिमा तळवलकर, प्राजक्ता परब या कलाकारांचा समावेश आहे. यांपैकी काही कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर विनम्रच्या लग्नाचे फोटो शेअर करत या नव्या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.