‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेचा शेवटचा भाग ‘या’ दिवशी प्रसारित होणार; अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका आणि प्रेक्षक यांचं नातं काही औरच असतं. दैनंदिन जीवनातील थोडासा विरंगुळा म्हणून प्रेक्षक मालिका पाहतात. हळूहळू या मालिकेतील कलाकार त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींमध्ये प्रेक्षक इतके रमून जातात कि ते आपल्या आयुष्याचा भागच समजू लागतात. त्यामुळे मालिकांसोबत आणि मालिकेतील कलाकारांसोबत प्रेक्षकांचे अनोखे नाते निर्माण होते. अशातच जेव्हा मालिका निरोप घेऊ लागतात तेव्हा मात्र प्रेक्षकांचे आणि कलाकारांचे भावनिक होणे फार साहजिक आहे. झी मराठीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ हि मालिका आता निरोप घेतेय आणि यानिमित्त अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

गेल्या काही महिन्यात झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये काही मालिका केवळ टीआरपी कमी असल्यामुळे बंद. करण्यात आल्या. दरम्यान आता झी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘नवा गडी नवं राज्य’सुद्धा निरोप घेते आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग काही दिवसांपूर्वीचं झालं असून डिसेंबर महिन्याच्या अखेरीस हि मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे असे समोर आले आहे.

या मालिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील, अनिता दाते- केळकर, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे अशी जबरदस्त स्टार कास्ट पहायला मिळाली. आता आनंदी, रमा, राघव, सुलक्षणा, वर्षा, रेवा सगळेच प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. त्यामुळे कलाकार मंडळी आणि प्रेक्षक अतिशय भावुक झाले आहेत.

या मालिकेत सुलक्षणा हि भूमिका साकारलेल्या अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी मालिकेतलं कलाकार मंडळींसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबत लिहिलंय, ‘अखेर आम्ही आता २३ डिसेंबरपर्यंत तुमच्या प्रेमाचे साक्षीदार राहणार आहोत. खूप प्रेम दिलंत मित्र- मैत्रिणींनो…आभार नाही मानणार कारण आपलं हक्काचं…जिव्हाळ्याचं नातं आहे’. या पोस्टवर अनेक प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देत मालिका बंद करू नये अशी मागणी केली आहे. तर काहींनी झी मराठीने चुकीचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. मालिकेचा शेवटचा भाग १० डिसेंबर रोजी शूट झाला असून येत्या २३ डिसेंबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.