‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचे 100 एपिसोड पूर्ण; अल्पावधीतच मुक्ता- सागरची जोडी ठरली लोकप्रिय


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. मालिकेतील सागर आणि मुक्ताच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. सध्या हि मालिका टीआरपीच्या शर्यतीत देखील अव्वल क्रमांकावर आहे. इतकेच नव्हे तर मालिकेत सुरु असलेल्या विवाह विशेष एपिसोडमुळे आता हि मालिका आपली अव्वल जागा लवकर सोडेल असे काही वाटत नाही. अशातच या मालिकेने १०० एपिसोडचा टप्पा गाठत मोठे यश मिळवले आहे. याबाबत स्टार प्रवाह वाहिनीवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

मालिकेतील विवाह विशेष एपिसोड्समधील काही महत्वाचे क्षण एकत्र करून तयार केलेला हा व्हिडीओ स्टार प्रवाहच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘आज सादर होत आहे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा 100 वा भाग…. आपण या 100 भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!! त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!’

मालिकेच्या कथानकाबद्दल बोलायचं तर, सध्या मालिकेत सागर आणि मुक्ताच्या लग्नाचे विशेष भाग सुरु आहेत. ज्यामध्ये सागरची पूर्वपत्नी सावनी येऊन खोडा घालण्याचा प्रयत्न करते. ज्यामुळे मुक्ता लग्न तोडून मंडप सोडून निघून जाते. ज्यामुळे गोखले आणि कोळी कुटुंब अस्वस्थ होते. पण मुक्ता पुन्हा मंडपात येते आणि सावनीचा डाव उधळून लावण्यासाठी तिने शक्कल लढवल्याचे सांगते. तसेच उपस्थितांची माफी मागून लग्नासाठी तयारी दाखवते. तिच्या निर्णयाचे सगळे कौतुक करतात. आपल्या वागणुकीने मुक्ता इंद्राचं मन जिंकते. आता आजच्या विशेष भागात सागर- मुक्ताचे लग्न पार पडेल. पुढे मालिकेत येणारे ट्विस्ट पहायला आतापासूनच प्रेक्षकांमधली उत्सुकता वाढली आहे.