‘.. ती परत आलीये’; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत काळ बनून भूतकाळ उभा राहणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ या लोकप्रिय मालिकेचे नवे पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. जयदीप- गौरीच्या पुनर्जन्मात त्यांनी अधिराज- नित्या म्हणून जन्म घेतला असून ते एकमेकांसमोर आले आहेत. अनोळखी असूनही त्यांच्यातील ओळखीचे नटे त्यांना एकमेकांकडे ओढताना दिसत आहे. मालिकेतील काही जुन्या पात्रांनी निरोप घेतल्याने मालिकेतील मजा निघून जाईल असे वाटत असताना या मालिकेतील एका जुन्या आणि लोकप्रिय पात्राची नुकतीच एंट्री झाली आहे.

पहिल्या पर्वात जयदीप आणि गौरीच्या मृत्यूला जबाबदारी असणारी शालिनी आता दुसऱ्या पर्वात तिची नवी खेळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक शालिनीच्या एन्ट्रीची वाट पाहत होते. अखेर आता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेची मुख्य खलनायिका शालिनी शिर्के पाटील परतली आहे. जयदीप-गौरीसोबत शिर्केपाटील कुटुंबांतील इतर सदस्यांना यमसदनी धाडणाऱ्या शालिनीचा भुतकर आता तिच्या समोर पुन्हा येणार आहे. शिर्के पाटलांना संपवल्यानंतर तब्बल २५ वर्षांनंतर ती पुन्हा कोल्हापुरात परतणार आहे.

इतकी वर्ष शालिनी कुठे होती..? कोणासोबत होती..? काय करत होती..? याची उत्तरं आगामी भागात मिळणार आहेत. मात्र यावेळी शालिनीचा लूक पूर्ण बदललेला असेल. एका नव्या रुपात आणि नव्या मनसुब्यांसह शालिनी २५ वर्षांनी परतणार आहे. अमेरिकेत राहिल्यानंतर तिच्या राहणीमानात बरेच बदल झाले आहेत. आतापर्यंत शालिनी साडीमध्ये आणि अस्खलित कोल्हापुरी भाषा बोलताना आपण पाहिली. पण आता तिचा मॉडर्न अंदाज पहायला मिळणार आहे.पण मूळ शालिनी आजही जशी होती तशीच आहे. त्यामुळे आता हि मालिका बघायला आणखी मजा येणार आहे.