‘ठरलं तर मग’मधील अपघाताचा प्रसंग दाखवण्यासाठी टीमने घेतली प्रचंड मेहनत; BTS व्हिडिओ व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेचे कथानक, यातील पात्र, येणारे ट्विस्ट कायम प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी तर प्रेक्षकांची फारच लाडकी आहे. त्यामुळे हि मालिका टीआरपीच्या रेसमध्ये देखील कायम टॉप ५ मध्ये दिसते आहे. सध्या मालिकेत मधूभाऊंच्या केसचा सिक्वेन्स सुरू आहे आणि यासाठी अर्जून- सायली पुरावे शोधत आहे. दरम्यान सायलीला तिचा भुतकाळ आठवू लागला आहे.

‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात महिपतने प्रतिमाचा खुन केल्याची कबुली दिल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुले मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. काही वर्षांपूर्वी किल्लेदार कुटुंबियाचा अपघात घडवून आणण्यात आला होता. ज्यात रविराज किल्लेदार सुखरूप वाचले. मात्र त्यांची लेक तन्वी हरवली आणि आश्रमात वाढली. तर दुसरीकडे पत्नी गंभीर इजा झाल्यानंतर ओळख बदलून जगू लागली. दरम्यान अपघातानंतर आपणच घटनास्थळी जाऊन प्रतिमाला जाळून मारल्याचे महिपतने यावेळी सांगितले.

हा भीषण प्रसंग दाखवताना मालिकेच्या टीमने घेतलेली मेहनत एका BTS व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. हा प्रसंग कसा उभा केला गेला..? महिपतने केलेला हल्ला, प्रतिमाची जीव वाचवण्याची धडपड आणि त्यानंतर प्रतिमाचा इजा झालेला चेहरा दाखवण्यासाठी केलेला प्रोस्थेटिक मेकअप अशी मालिकेच्या टीमने घेतलेली प्रचंड मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे. हा व्हिडिओ प्रतिमा ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी शेअर केला आहे. ज्यावर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.