झी मराठीवरील ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; काही महिन्यांतच गाशा गुंडाळला


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी हि अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षकांच्या अत्यंत लाडक्या आहेत. प्रत्येक मालिकेचा स्वतःचा असा वेगवेगळा चाहता वर्ग आहे. मुख्य म्हणजे झी मराठीवरील सर्व मालिका कौटुंबिक असल्यामुळे परिवारासोबत कोणत्याही वयोगटातील व्यक्ती अगदी सहज पाहू शकते. त्यामुळे टीआरपी रेसमध्ये देखील झी मराठीवरील मालिका टॉप १० मध्ये असतात. दरम्यान झी मराठीवर अलीकडेच काही महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या २ मालिका अचानक निरोप घेणार असल्याचे समोर आले आहे.

माहितीनुसार, झी मराठी वाहिनीवरील २ अत्यंत चांगल्या मालिका बंद होत आहेत. यामध्ये बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित ‘लोकमान्य’ ही मालिका अचानक प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समजताच प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. तर या मालिकेपाठोपाठ आता आणखी एक मालिका उत्कंठावर्धक वळणावर असूनही निरोप घेतेय असे समोर आले आहे. हि मालिका आहे ‘३६ गुणी जोडी’. होय. ‘लोकमान्य’ आणि ‘३६ गुणी जोडी’ या दोन्ही मालिका काहीच महिन्यांपूर्वी सुरु झाल्या होत्या आणि आता त्या सांगतेकडे मार्गस्थ झाल्या आहेत.

https://www.instagram.com/reel/CuSXAYrhFa0/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

झी मराठीवरील ‘लोकमान्य’ ही मालिका डिसेंबर २०२२ रोजी तर ‘३६ गुणी जोडी’ ही मालिका जानेवारी २०२३’मध्ये सुरु झाली आहे. अवघ्या ७- ८ महिन्यात या मालिका बंद होत असल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत. मुख्य म्हणजे आता या मालिकांमधील प्रेक्षकांची रुची वाढू लागली होती. मालिकांचा चाहता वर्ग वाढू लागला होता. तोच आता या मालिका बंद होणार असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर प्रेक्षक या मालिका बंद करू नये म्हणून आग्रही असल्याचे दिसत आहे. पण माहितीनुसार या मालिकांच्या जागी नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.