पूर्ण होईल का मुक्ता- सागरच्या प्रेमाची गोष्ट..? ‘या’ दोन व्यक्ती घेणार पुढाकार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे हे मुख्य भूमिकेत झळकत आहेत. मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांची नियमित उत्सुकता वाढविण्याचे काम करतात. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेली ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा टॉप ५ मध्ये आहे. सध्या मालिकेत साईच्या कस्टडीचा निर्णय होताना पहायला मिळतोय. दरम्यान सागर आणि मुक्ताला जवळ आणण्यासाठी दोन व्यक्ती प्रयत्न करताना दिसत आहेत.

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत दिवाळी सिक्वेन्स सुरु असून गोखले आणि कोळी कुटुंबातील वाद काही संपायचे नाव घेईन. सतत या ना त्या कारणामुळे दोन्ही घरातील कुटुंबीय भांडताना दिसतात. पण अशातच मुक्ता आणि सागरच्या प्रेमाची गोष्ट पूर्ण करण्यासाठी दोन व्यक्ती पुढाकार घेताना दिसत आहेत. या दोन व्यक्ती म्हणजे मुक्ताचे बाबा आणि सागरचे बाबा. मालिकेत सईच्या कस्टडीचा निर्णय होताना ती मम्मी- पप्पांऐवजी मुक्ता आंटीकडे राहण्याचा निर्णय घेताना दिसते. दरम्यान मुक्ता कोर्टाला विनंती करते, ‘तिचं हसू तिला परत द्या, एवढं नातं माझं सईशी आहे’. त्यामुळे सईची कस्टडी नेमकी कोणाला मिळेल..? याच उत्तर आजच्या भागात मिळेल.

यानंतर सोसायटीच्या सरचिटणीस पदाची निवडणूक दाखवली जाईल. ज्याचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा महाएपिसोड असून यामध्ये मुक्ता आणि सागर मतदान करताना दोघांचा हात मतपेटीत अडकतो. तर सागर मुक्ताला म्हणतो, ‘तुमच्यात संयमचं नाहीये.’ यावर मुक्ता शक्कल लढवून दोघांचा अडकलेला हात बाहेर काढते. हा प्रकार मुक्ताचे बाबा आणि सागरचे बाबा पाहतात. मुक्ताचे बाबा म्हणतात, ‘मुक्ता आणि सागरचं लग्न लावायलाच हवं’. यावर सागरचे बाबा म्हणतात, ‘आता यांच्या प्रेमाची गोष्ट आपणच पूर्ण करून दाखवणार.’ हा महाएपिसोड रविवारी १९ नोव्हेंबरला दुपारी १२ आणि रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे.