Aai Kuthe Kay Karte – आशुतोषने अरुंधतीकडे व्यक्त केली बाबा होण्याची इच्छा; नेटकरी म्हणाले, ‘आहेत ती मुलं कमी आहेत..?’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Aai Kuthe Kay Karte) स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. पहिल्या दिवसापासून या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मालिकेचे कथानक, कलाकारांचा अभिनय, मालिकेतील ट्विस्ट आणि टर्न्स सगळं काही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हि मालिका टीआरपी रेसमध्येही अव्वल होती. होती म्हणायचे कारण असे कि आता या मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांचे मन जिंकण्यात असमर्थ ठरत आहेत. ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Aai Kuthe Kay Karte

दरम्यान या मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. त्यामधील ट्विस्ट पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. काही महिन्यांपूर्वी मालिकेत आशुतोष आणि अरुंधतीचं लग्न पार पडलं. यानंतर मालिकेतील वळणं प्रेक्षकांच्या डोक्यावरून जात गेली. (Aai Kuthe Kay Karte) अशातच आता आशुतोषने अरुंधतीकडे त्याला बाबा व्हायचंय, अशी इच्छा व्यक्त केली आहे. या प्रोमोत आशुतोष अरुंधतीला म्हणतो, ‘मला बाबा व्हायचं आहे अरुंधती. आपण मूल दत्तक घेतलं तर..?’ यावर अरुंधती म्हणते, ‘ते शक्य नाहीये. पुन्हा एक नवीन जीव आपल्या आयुष्यात येणार. आपण त्याला मोठं करायचं…या सगळ्याला खूप बळ लागतं. मला नाही वाटत आता माझ्याकडे ते उरलं आहे’.

(Aai Kuthe Kay Karte)

हा प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीच्या अधिकृत सोशल मिडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. जो पाहून नेटकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत प्रेक्षकांनी या ट्विस्टबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलंय, ‘काय होती सीरियल आणि आत्ता काय चाललय … पहिल्यांदा दुसऱ्या दिवशी कधी एपिसोड येतो वाट बघावी लागत होती आत्ता कित्ती दिवस झाले सिरियालच बघतली नाही …. बोर करून टाकले आहे’. (Aai Kuthe Kay Karte) आणखी एकाने लिहिलं, ‘कुठे भरकटली आहे मलिका…त्या अरूंधती चा मुलांना मुल झाली…काय फालतू पणा चाललाय…’. अन्य एकाने लिहिलं, ‘ऐकावं ते नवलंच!! एव्हडी मुलं आहेत ति कमी आहेत का?’