Aishwarya Rai Birthday | ‘तो माझ्यावर संशय घ्यायचा…’ ब्रेकअप नंतर ऐश्वर्याने सलमानवर लावलेले गंभीर आरोप


Aishwarya Rai Birthday |बॉलीवूड अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला आज कोणाच्या ओळखीची गरज नाही. तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांच्या मनावर ती आजपर्यंत अधीराज्य गाजवले आहे. एवढेच नव्हे तर 1994 मध्ये तिने मिस वर्ल्ड किताब देखील आपल्या नावे केलेला आहे. आज म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी ऐश्वर्या राय-बच्चन तिचा 50 वा वाढदिवस (Aishwarya Rai Birthday) साजरा करत आहे. यामुळे सोशल मीडियावर तिचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai) आजपर्यंत अनेक चित्रपटात काम करून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. परंतु तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे ती जितकी चर्चेत राहिली तितकी चर्चेत वैयक्तिक आयुष्य देखील राहिली. लग्नाआधी ऐश्वर्या राय आणि सलमान खान (Salman Khan) यांचे रिलेशन खूप गाजले होते. इंडस्ट्रीज आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील त्यांच्या या रिलेशनची खूप चर्चा होती. या दोघांनी जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केले. परंतु 2002 मध्ये त्या दोघांचे ब्रेकअप झाले आणि त्यानंतर ऐश्वर्याने सलमान खानवर अनेक आरोप लावले होते.

हेही वाचा-‘आता झिम्माच्या बायका परत…’; सिद्धार्थ चांदेकरच्या फोटोवरील कॅप्शनने वेधलं लक्ष

हम दिल दे चुके च्या सेटवर पडले प्रेमात | Aishwarya Rai Birthday

संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री त्यांची गाणी तसेच त्यांचा अभिनय देखील प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाच्या सेटवर अभिनय करता करता से एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोन वर्षे एकमेकांना देठ करत होते परंतु दोन वर्षानंतर त्यांच्या नात्यात कटूता आली आणि त्यांनी ब्रेकअप केले की त्यानंतर त्यांनी एकमेकांचे तोंड पाहणे देखील पसंत केले नाही.

सलमान खानने केली ऐश्वर्याच्या घराची तोडफोड

दोघांचे ब्रेक-अप झाले तरी सलमानला या नात्यातून बाहेर पडायचे नव्हते . हाती आलेल्या माहितीनुसार 2001 मध्ये सलमान ऐश्वर्याच्या घरी पोहोचला होता आणि रागाच्या भरात त्याने ऐश्वर्याच्या फ्लॅटच्या खिडकीची काच तसेच फर्निचर देखील तोडली होती . आणि त्यावेळी ऐश्वर्याच्या वडिलांनी सलमान खान विरोधात तक्रार सुद्धा दाखल केली होती. त्याचप्रमाणे कुछ ना कहो या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान देखील सन्माननीय ऐश्वर्याच्या गाडीला टक्कर देत ऐश्वर्याच्या गाडीची काच मोडली होती.

त्यानंतर एका मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले होते की, “,ब्रेकअपनंतर सलमान मला सारखा फोन करायचा आणि कोणाला डेट करतीये का असे प्रश्न विचारायचा. आणि सतत त्याच्या मनात संशय येत होता. त्याचप्रमाणे अभिषेक बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत माझे नाव जोडले होते. सलमानने अनेकदा माझ्यावर हात सुद्धा उचलला होता.”ऐश्वर्याने असे देखील सांगितले की, त्यांच्या रिलेशनमध्ये सलमानने तिच्यासोबत फसवणूक केली होती परंतु या ब्रेकअपचा सलमानने स्वीकार केला नाही आणि सतत तिला त्रास देत होता.

हेही वाचा- ‘हा त्यांचा शेवटचा सिनेमा..’; ‘सूर लागू दे’च्या पोस्टर लाँचवेळी विक्रम गोखलेंच्या आठवणीत मांजरेकर झाले भावुक

ऐश्वर्या राय वैवाहिक जीवन

त्यानंतर ऐश्वर्या रायने बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्याशी विवाह केला. त्या दोघांना आता आराध्या नावाची नावाची एक मुलगी देखील आहे. ऐश्वर्या राय सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. परंतु ती तिच्या संसारात खूप सुखी आहे.