‘नसेन मी सोबतीला.. आता सांभाळ या मुलीला’; अमृताच्या बाबांनी संगीत सोहळ्यात म्हटली स्वरचित कविता


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख आज लग्न बंधनात अडकणार आहेत. नुकतीच अमृता आणि प्रसाद यांचे ग्रहमख, मेहंदी, हळद आणि संगीत समारंभ पार पडला. या समारंभादरम्यान जवादे आणि देशमुख कुटुंबीय तसेच अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. अमृता आणि प्रसाद दोघेही आपल्या लग्नाच्या आधीचे विधी एन्जॉय करतां दिसले. दरम्यान अमृताच्या बाबांनी तिच्यासाठी एक खास कविता सादर केली. जी त्यांनी स्वतः तयार केली होती. त्यांची कविता ऐकून सगळे भावुक झाले.

अमृताच्या बाबांनी सादर केलेली कविता पुढीलप्रमाणे:-

नाचण्यात दंग होते असे की हरवल्या होत्या त्यांच्या दिशाही,
गुंतले होते जीव असे की डोळ्यात दिसत होतं यांना सर्वकाही,
प्रीतीचा बहर फुलला असा काही त्या गंधाची चढली होती नशाही,
आपण दोघं केवळ दोघं दुसरं कुणीही नाही,
हे भल्या माणसा एक जरा मी सांगतो गुपित तुला,
मी तिला आणि तिने मला रे पहिला वहिला श्वास दिला,
सांगेल तुला ती अर्थ जगाचाआधी तिने माझ्यातच पाहिला,
मी कसा विसरू सांग? मी कसा विसरू सांग

त्या तिच्या शांत श्वासांना, झोपेतल्या मिश्किल हसण्याला,
दुधाचा वास जेव्हा आला तिच्या नाजूक साजूक ओठांना
मी कसा विसरू सांग? मी कसा विसरू सांगकुशीतल्या त्या क्षणांना, तिच्या माझ्या मिठीला,
हृदयातून गलबलताना घेतलेल्या चिमुकल्या मुक्याला,
आणि इवल्या इवल्या बोटांनी बोट माझं धरायला,
बोबड्या बोबड्या बोलांनी बाबा म्हणून हसण्याला,
आठवतंय अजूनही, ओढलेली मिशी, तुटलेला चष्मा आणि फेकलेलं पेन
ओळखीची चाहूल मारलेली, मारलेली मुसळी आणि तुटलेली चैन,

कळतंय रे बापाच्या अंत नसतो भावनेला,
पण प्रश्न मनात आला तुझ्यासोबत पाहून या राणीला,
हेच का ते उनाड बछडं, रात्री गोष्टीसाठी हटणारं,
डोळ्यात जीव आणून परिकथेत रमणारं,
उठली कळ आणि एक उसासा, महिमा काळाचा हा असा,
असो आता सांभाळ या मुलीला, माझ्या लाडक्या जीवाला
अरे असेल जर ही जगरहाटी तर काळही बदलेल कधी कुशीला
नसेनही मी सोबतीला, नसेल अडसर तुला
पण स्मरशील मला तिच्या पहिल्या प्रेमाला,
मी तिच्यावर पहिलं प्रेम केलं होतं,
मी तिच्यावर पहिलं प्रेम केलं होतं.

त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.