अंतरा- मल्हारचा प्रवास संपला; ‘जीव माझा गुंतला’ मालिकेने घेतला प्रेक्षकांना निरोप


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून अनेक मालिकांनी एकामागे एक प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यातील बऱ्याच मालिका केवळ टीआरपी मिळत नसल्यामुळे बंद करण्यात आल्या. यातील कितीतरी मालिकांचे कथानक देखील पूर्ण झाले नव्हते. केवळ टीआरपी कमी असल्यामुळे या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला. तर काही मालिकांचे कथानक सुफळ संपूर्ण झाल्यानंतर मालिका संपल्या. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेनंतर आता ‘जीव माझा गुंतला’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

शनिवारी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला आणि यानंतर ही मालिका ऑफ एअर गेली आहे. अलीकडेच या मालिकेने ७०० भागांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला होता. मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत मालिकेला निरोप दिला आहे. हि मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरल्यानंतर तब्बल दोन वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. मालिकेचे कथानक आणि मालिकेतील पात्र ही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. त्यामुळे या मालिकेचा टीआरपी देखील चांगला होता. पण मध्यंतरी मालिकेचा टीआरपी घसरला आणि आता मालिका बंद झाली आहे.

दरम्यान ‘जीव माझा गुंतला’ मालिकेचे कथानक पूर्ण झाल्यानंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तरीही प्रेक्षकांमध्ये ही मालिका बंद झाल्याने नाराजी पसरली आहे. या मालिकेचे कथानक आणखी पुढे हवे होते, अशा भावना प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. मालिकेतील मल्हार आणि अंतराची जोडी प्रेक्षकांची अत्यंत लाडकी जोडी ठरली. पण काही महिन्यांपूर्वी मालिकेचा ट्रॅक कंटाळवाणा झाल्यामुळे टीआरपीवर त्याचा परिणाम झाला आणि त्यामुळे मालिका बंद झाल्याचेही बोलले जात आहे.