‘त्या’ खास व्यक्तीच्या आठवणीत भावुक झाला हार्दिक जोशी; म्हणाला, ‘मला नेहमी खंत राहील..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चालतंय की.. म्हणत अभिनेता हार्दिकने जोशीने साकारलेला राणा दा प्रत्येकाच्या मनात घर करून बसला.या भूमिकेमुळे अभिनेता हार्दीक जोशीला मोठा चाहता वर्ग मिळाला. त्याचे चाहते त्याला कायम वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, प्रोजेक्ट्समध्ये पाहण्यासाठी आतुर असतात. सध्या तो झी मराठीवरील ‘जाऊ बाई गावात’ या रिऍलिटी शोचे सुत्रसंचालन करताना दिसतोय. हार्दीकचा हा शो प्रचंड चर्चेत असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या शो निमित्त हार्दीक जोशीने दिलेल्या एका मुलाखतीत एक भावनिक किस्सा शेअर केला आहे.

एका वाहिनीसोबत बोलताना हार्दिकने ‘जाऊ बाई गावात’ हा शो स्वीकारताना त्याच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती..?’ याबद्दल सांगताना म्हटले कि, ‘माझ्यासाठी हा शो माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे. माझी वहिनी खूप आजारी होती आणि मी ह्या शोमधून आपले पाऊल मागे घेत होतो. पण जेव्हा माझ्या वहिनीला समजले की मी ”जाऊ बाई गावातला” नकार द्यायला जात होतो, तेव्हा हॉस्पिटलमध्ये तिने तिच्या हातात माझा हात घेतला आणि माझ्याकडून वचन घेतले की हा शो तू सोडायचा नाही’.

पुढे म्हणाला, ‘कारण वहिनीला माहिती आहे की, मी कामातून कधी माघार घेत नाही. तर तिचं म्हणणं होते की जी गोष्ट आज पर्यंत नाही केली ती ह्या पुढे ही करायची नाही. हा शो मी फक्त तिच्यामुळे करतोय आणि योगायोग असा कि ”जाऊ बाई गावातचा” पहिला एपिसोड तिच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसारित झाला. पण मला नेहमी खंत राहील की कार्यक्रमाचा पहिला एपिसोड बघायला ती ह्या दुनियेत नव्हती. मी माझ्या प्रत्येक दिवसाची सुरूवात तिला नमस्कार करून करतो’. वहिनीच्या निधनानंतर हार्दिकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.