‘मीरा आऊट.. केतकी इन’; ‘ठरलं तर मग’ मालिकेतील साक्षी बदलली


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सध्या पहिल्या नंबरवर आहे. मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांना अक्षरशः प्रेमात पाडतेय. या मालिकेने अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र आपापली भूमिका अव्वलरित्या साकारतो आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’तून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री मिरा जगन्नाथने नुकताच या मालिकेला रामराम ठोकल्याचं समोर आलं आहे.

अभिनेत्री मीरा जगन्नाथ ‘ठरलं तर मग’ या मालिकेत ‘साक्षी’ हे पात्र साकारताना दिसली होती. ती साकारत असलेलं हे पात्र नकारात्मक असलं तरीही प्रेक्षकांच्या मनात तिने साक्षी म्हणून एक जागा तयार केली होती. अशातच आता मीरा जगन्नाथने ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या साक्षीची साथ सोडत मालिकेला निरोप दिला आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by 𝑀𝐼𝑅𝐴🖤 (@teammirajaggnath)

यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र मीराने मालिका इतकी रंगात आलेली असताना निरोप घेतल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत. अभिनेत्री मीरा जगन्नाथने ही मालिका सोडल्यानंतर आता साक्षीची भूमिका अभिनेत्री केतकी पालव साकारते आहे.

मीरा जगन्नाथने जरी अचानक मालिकेतून एक्झिट घेतली असली तरीही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात हि मालिका कुठेच कमी पडणार नाहीये. म्हणून मीराच्या जागी आता साक्षी हे नकारात्मक पात्र अभिनेत्री केतकी पालव साकारताना दिसते आहे. याआधीदेखील केतकीने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवाय तीच ‘आमने सामने’ हे नाटक चांगलं गाजलं आहे. दरम्यान ‘ठरलं तर मग’ या मालिकेचा टीआरपी सध्या अतिशय चांगला आहे आणि असे असूनही मीराने मालिकेत सोडल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.