पुण्यात गांधी जयंतीनिमित्त माने घेणार परिसंवादात सहभाग; म्हणाले, ‘डरे हुए लोगों का देश..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर २०२३ रोजी साजरी केली जाते. यानिमित्ताने पुण्यात खास परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. माहितीनुसार, या परिसंवादात किरण माने सहभागी होणार आहे. यानिमित्ताने किरण मानेंनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय, ”’अच्छा हुआ बापू रियल में नहीं है यार, अगर आज वो यहाँ होता न… तो ये डरे हुए लोगों का देश देख के बहुत रोता था यार!” लगे रहो मुन्ना भाईमधला मुन्नाभाईचा हा डायलाॅग त्यावेळी फक्त आवडला होता. आजच्या काळात रोज आठवून अंगावर शहारा येतो… खरंच हा देश ‘डरे हुए’ किंवा ‘डराए गये’ लोगोंका देश झालाय यात शंका नाही. भल्याभल्या वाघांची शेळी झालीय. नेत्यांपास्नं सामान्य जनतेपर्यन्त सगळीकडे आज भेदरलेले लोक दिसतात. इडीच्या भितीनं भलेभले गामा लाचार होऊन, विचारधारेची सुरळी करून गपगुमान या कळपातनं त्या कळपात जाऊ लागलेत’.

‘आपली लफडी- कुलंगडी बाहेर काढून, आजवर दाबलेल्या फायली ओपन केल्या तर? तिथपास्नं ते सामान्य माणूसबी हादरलाय. ही पोस्ट केली तर मला अर्वाच्य शब्दांत ट्रोल तर करणार नाहीत ना? ती कमेन्ट केली तर मला मेसेंजरमध्ये धमक्या तर येणार नाहीत ना? ते विधान केले तर मला कामावरून काढून तर टाकणार नाहीत ना? या भितीनं अन्याय सहन करून मूग गिळून गप्प बसलेले लोक जागोजागी दिसताहेत… सद्य स्थितीवर महिलांवर होणारे अत्याचार बघून माने लिहीतात, “मग स्त्रियांना विवस्त्र करुन धिंड काढलेली काळीज पिळवटणारी घटना घडूदेत किंवा बलात्कारीत मुलगी रक्तबंबाळ होऊन मदत मागत रस्त्यावरून फिरतानाचं विदारक दृश्य दिसूदेत… महागाई-बेरोजगारीनं कंबरडं मोडूदेत किंवा धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी कुणा निरपराध्याची हत्या घडवुन आणली जाऊदेत… मिडीयासकट सगळे चिडीचूप आहेत. केली बातमी, अन् नोकरी गेली तर? शेवटी पोटापाण्यावर आल्यावर काय करणार माणूस?”

पुण्यात होणाऱ्या परिसंवादाचे तपशील सांगत ते म्हणाले, ‘सगळीकडे फक्त भिती, भिती आणि भितीचं साम्राज्य आहे… अशा परिस्थितीत गांधी जयंती सप्ताह साजरा करताना परीणामांची पर्वा न करता भवतालावर, सद्यस्थितीवर निर्भिडपणे बोलून ती साजरी करण्याची ही कल्पना लै आवडली मला. यात डाॅ. मणिंद्रनाथ ठाकूर, पी. साईनाथ, सुधींद्र कुलकर्णी असे अनेक मान्यवर बोलणार आहेत. पुण्यात ‘गांधी भवन’मध्ये होणार्‍या या सप्ताहातल्या एका परीसंवादात बोलायला मलाही आमंत्रित केलेय… खरंतर कुमार सप्तर्षी, विजय चोरमारे, श्रीराम पवार अशा दिग्गजांसोबत मी काय बोलणार? अनुभवाने,ज्ञानाने आणि वयानेही यांच्यापेक्षा मी खूप लहान आहे. तरीही हा सन्मान मी तेवढ्याच नम्रपणे स्विकारला आहे… माझ्या कुवतीनुसार मी मन मोकळं करणार आहे… कारण पुढे जाऊन या भयाण काळाच्या आठवणी निघतील, तेव्हा माझ्या पुढच्या पिढ्यांनी माझ्याबद्दल अभिमानानं सांगीतलं पायजे, “उस ज़माने में, ख़ौफ़ के माहौल में भी हमारा बंदा ‘डरा’ नहीं था… खूंखार दरींदों के सामने झुका नहीं था… मानवता का झंडा हाथ में लिए, ‘सच’ के साथ डट के खडा था !”