‘मला आई व्हायचं होतं….’; घटस्फोटानंतर पहिल्यांदाच मोकळेपणाने व्यक्त झाली मानसी नाईक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बघतोय रिक्षावाला’ म्हणत संपूर्ण महाराष्ट्र गाजवणारी अदाकारा म्हणजे मानसी नाईक. तिने कायम आपल्या नृत्यशैलीच्या जोरावर प्रेक्षकांमध्ये आपलं क्रेझ राखलं आहे. एक उत्तम अभिनेत्री आणि तितकीच उत्तम नृत्यांगना अशी तिने सिनेविश्वात भक्कम ओळख आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून खासगी आयुष्यामुळे मानसी प्रचंड चर्चेत राहिली. दरम्यान घटस्फोटानंतर पहिल्यांदाच मानसी नाईकने लग्न का केलं? याच उत्तर तिने स्वतःच दिलं आहे.

नुकतंच अभिनेत्री मानसी नाईकने अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केले आहे. लग्न ते घटस्फोट तिने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. मानसी म्हणाली कि, ‘प्रत्येक मुलीच्या बकेट लिस्टमधील इच्छा असते की लग्न करावं, कुटुंब असावं. मी लग्नानंतर बांगड्या, भांगेत कुंकू या सर्व गोष्टी मी प्रेमाने केल्या. लग्नसंस्था, सप्तपदी, मेहंदी यांसारख्या जे अनादर करतात. त्याचा माजही दाखवतात जा केलं तर काय, असंही म्हणतात. पण आता मी त्यातून बाहेर पडलीय. त्यामुळे मी खूप आनंदी आहे’.

पुढे म्हणाली, ‘मला लग्न करायचं होतं. माझं कुटुंब असावं वगैरे असं मला वाटतं होतं. पण खरंतर रीलपुरतंच हा प्रवास होता. फक्त मीडिया, प्रसिद्धी या गोष्टींसाठी हे सर्व होतं. मला जे काही सांगण्यात आलं, त्यातील एकही गोष्ट खरी नव्हती. मला नेहमीच एक सून म्हणून, बायको म्हणून मला माझं कुटुंब हवं होतं. ते स्वप्न माझं अपुरं राहिलं आहे. पण मी आता ते मी नक्कीच पूर्ण करेन. कारण माझा प्रेमावरचा विश्वास उडालेला नाही. मी ग्लॅमरस दिसत असले तरी माझे पाय जमिनीवर आहेत. मी जर माझ्या अंगी एखादी गोष्ट आणली तरच मी माझ्या मुलांना ते शिकवू शकेन. मला आईदेखील व्हायचं होतं, म्हणूनच मी रडले’. घटस्फोटानंतर आता मानसी तिच्या आयुष्यात पुढे सरकते आहे आणि नव्या उमेदीने जगते आहे. यासाठी तिला तिचे चाहते कायम चिअर करताना दिसतात.