Milind Gavali | ‘मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास शिकायचा असेल तर…’ मिलिंद गवळी यांची पोस्ट व्हायरल


Milind Gavali| आई कुठे काय करते ही टेलिव्हिजन वरील एक लोकप्रिय मालिका आहे या. मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी हे देखील आजकाल खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाले आहे. सोशल मीडियावर देखील ते मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. समाजातील विविध घटकांवर तसेच विषयांवर ते पोस्ट करत असतात. मिलिंद गवळी हे नुकतेच लोहगड या किल्ल्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी गडावर चढताना एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि त्याच्यासोबत एक खास विचार देखील त्यांनी सगळ्यांसोबत शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करत मिलिंद गवळी यांनी लिहिले आहे की, “लोहगड परवा हा गड चढायचा योग आला खूप छान वाटलं. आपल्याला गड चढता येतो, याचे एक वेगळं समाधान असतं. उंच डोंगर चढणं काय साधी गोष्ट नसते. पण जेव्हा गड चढतो तेव्हा आपल्याला धाप लागत असते. काही लोक थांबत थांबत चढतात, तर काहींचा स्टॅमिना चांगला असतो. ते एका दमात गड चढायचा प्रयत्न करतात. दररोज व्यायाम म्हणून गड चढणारे लोक पण आहेत.”

यापुढे त्यांनी लिहिले की, “एकदा का आपण गडावर पोहोचलो की, एक वेगळ समाधान मिळतं, वेगळीच शांती मिळते. माझ्याबरोबर झेन आमचा कुत्रा होतो. तो एका जमात वरती धावत सुटला. त्याचा स्टॅमिना बघून मला त्याचा हेवा वाटला. असं वाटलं की, आपल्यामध्ये सुद्धा अशी ताकद यायला हवी.”

यापुढे त्यांनी लिहिले की, “गडावर पोहोचल्यावर असंख्य विचार मनात येतात. ते विचार असे होते की जर शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना शिकवायचा असेल तर तो वर्गात बसून न शिकवता जर आपण गडावरच मुलांना घेऊन गेलो. आणि तेथे त्यांना इतिहास शिकवला तर तो त्यांच्या कायमस्वरूपी मनामध्ये घर करून बसेल. आणि शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोचू शकतील. ज्याप्रमाणे रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना केली एक वेगळी शिक्षण पद्धती तयार केली तसेच आपण का नाही तयार करू शकत.”

हेही वाचा – बॉलिवूडच्या ट्रेंडिंग गाण्यावर अमृता फडणवीसांचा डान्स; नेटकरी म्हणाले, ‘आता बास्स!! 500 रुपये देतो पण…’

यापुढे त्यांनी लिहिले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, राजामाची, विसापूर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, चंद्रगड, सुरगड, घोसाळगड, कडाकरी, रायगड, तोरणा, राजगड, सिंहगड आणि विशाळगड या सगळ्यांवर जर मुलांसाठी शाळा सुरू केल्या. आणि तिथे त्यांना इतिहास शिकवला तर मला नाही वाटत की, या जन्माची मुलं कधी आपला महान इतिहास विसरतील. आत्ताच्या या इंटरनेट शिक्षण पद्धतीतून त्यांना बाहेर काढायचे असेल, तर गड चढायला लावणे आणि गडावर इतिहास शिकवणे हा एक छान पर्याय मला सुचतो आहे.”

मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. अनेकांना त्यांचे हे मत पटले आहे त्यामुळे अनेकजण त्यांना सपोर्ट करत त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत आहेत.