आता अनिरुद्धची काय भूमिका आहे..? मालिकेतील ट्विस्टबाबत मिलिंद गवळींची लक्षवेधी पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या एक वेगळाच ट्वीस्ट पहायला मिळतोय. मालिकेत आरोही नावाच्या नवीन पात्राची एंट्री झाली असून तिच्यावर काही श्रीमंत घरातील मुलांनी बलात्कार केल्याचे दाखवले आहे. या घटनेत देशमुख कुटुंबीय आरोहीच्यामागे खंबीरपणे उभे असल्याचे दिसत आहे. मालिकेत निगेटिव्ह भूमिका असलेला अनिरुद्धदेखील यावेळी सकारात्मक पद्धतीने वागताना दिसतो आहे. यानिमित्ताने अनिरुद्ध देशमुख हि भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी यांनी नुकतंच अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत एक लांबलचक पोस्ट शेअर करत लिहिलंय, ‘अनिरुद्ध देशमुख ज्यावेळेला असा stand घेतो त्यावेळेला अनेकांच्या मनामध्ये आणि माझ्या मनामध्ये पण असा विचार येतो की आता या माणसाचं काय करायचं, माणूस इतका चांगला पण वागू शकतो ?, असा प्रश्न आल्या शिवाय राहत नाही, अनिरुद्ध च नाव इतकं बदनाम झालं आहे, की तो जे करेल ते चुकीचं आहे असं मनामध्ये भावना येणं साहजिक आहे, काही काही situations मध्ये हा माणूस अगदी हिरो सारखाच वागतो, surprise करतो सगळ्यांना, मी पण ज्या वेळेला script वाचतो त्यावेळेला नकळत माझ्या चेहऱ्यावर एक smile येतं आणि मन भरून येतं, डोळे सुद्धा भरून येतात, मनातल्या मनात नमिता वर्तक हिला thank you सुद्धा म्हणत असतो’.

‘पण खरंच आहे किती वाईट माणूस असला तरी काही काही बाबतीत माणसाने ठाम भूमिका घ्यायलाच हवी, योग्य माणसांना साथ द्यायलाच हवी, मुंबई पोलिसांच्या बाबतीत एक खूप चांगली गोष्ट ऐकली आहे, ती म्हणजे खात्यामध्ये corruption आहे, पण एखादा पोलिस वाला कितीही corrupt असला तरी असं म्हटलं जातं की Rape, Murder, Drink & Drive आणि drugs या cases मध्ये कुठलाही पोलिसवाला कधीही तो पैसे खात नाही , गुन्हेगाराला कधीही साथ देत नाही, कदाचित अनिरुद्ध देशमुखचं असंच काहीतरी असावं. या scene मध्ये ज्यावेळेला तू आरोहीची बाजू घेऊन बोलतो, जे प्रत्येकाने करायला हवं तेच करतो, त्यावेळेला खरंच अनिरुद्ध साकारायला मला मजा येते. मला रोज अनिरुद्ध ची एक नव्याने ओळख होत जाते, आणि पुन्हा एकदा त्या अनिरुद्ध देशमुख च्या प्रेमात पडावसं वाटतं. हा अनिरुद्ध देशमुख नमिता वर्तक आणि राजनजी शाही यांच्या विचाराने घडत जात असतो, खरं तर माझ्या हातात काहीच नाहीये, लोकं मला त्या भूमिकेसाठी ओळखतात, पण अनिरुद्ध देशमुख हे तेच घडवत असतात, प्रेक्षकांसारखा मी सुद्धा आतुरतेने वाट बघत असतो की आता अनिरुद्धची काय भूमिका आहे”, असे मिलिंद गवळी यांनी म्हटले आहे.