अनिरुद्ध पुन्हा ट्रोल!! प्रेक्षक म्हणाले, ‘अजून किती खालच्या पातळीला जाणार..’; मिलिंद गवळींनी दिले प्रत्युत्तर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील अत्यंत टीआरपी खेचणारी मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र वठविणारे कलाकार हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक चांगला किंवा वाईट ट्विस्ट प्रेक्षकांवर प्रभाव टाकतो. सध्या मालिकेत अनिरुद्धचा अहंकार नवनवीन संकटांना कारणीभूत ठरताना दिसतोय. आधी वीणाच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींचा गैरवापर, मग संजनासोबत गैरवर्तन आणि आता मुलगी ईशाच्या साखरपुड्याच्या विघ्न होऊन अनिरुद्ध त्याचा पुरुषी अहंकार सुखावतोय. हे पाहून परीक्षक भडकले आहेत आणि त्याला ट्रोल करू लागले आहेत.

सोशल मीडियावर अनिरुद्ध ट्रोल होणे म्हणजेच हि भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांना ट्रोलिंगचा मारा सहन करायला लागणे. मिलिंद गवळी यांनी अनिरुद्ध देशमुख हि भूमिका इतकी उत्तम साकारली आहे कि प्रेक्षकांचा संताप हि त्यांच्या कामाची पोचपावती म्हंटले तर चूक ठरणार नाही. अनिरुद्धमुळे नेहमीच मिलिंद ट्रोल होत असतात. आताही तसेच झाले. मिलिंद गवळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यामुळे विविध पोस्ट शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अशीच त्यांनी एक बालपणीची आठवण शेअर करताना एक पोस्ट लिहिली आहे.

या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. यातील काहींनी मिलिंदसाठी नव्हे तर अनिरुद्धसाठी कमेंट केल्या आहेत. सध्या मालिकेत अनिरुद्ध ईशा आणि अनिशच्या लग्नाला विरोध करताना दिसतोय. दुसरीकडे वीणा अनिरुद्धला नोकरीवरुन काढून टाकते आणि त्यामुळे तो संतापून आता सर्वांना त्रास देतोय. त्याच हे वागणं प्रेक्षकांना खटकल्यामुळे ते संताप व्यक्त करत आहेत. एका युजरने मिलिंद यांच्या पोस्टवर एका महिला युजरने कमेंट करत लिहिले आहे कि, ‘अजून किती खालच्या पातळीला जाऊन दृष्टपणाचा कळस गाठणार आहात. लाज वाटते’. तर या कमेंटला मिलिंद गवळींनी उत्तर देत लिहिले आहे कि, ‘नमिताला माहिती असणार’. नमिता वर्तक ही या मालिकेची लेखिका आहे.