परकेपणा संपणार..? सायली- अर्जुनच्या डीनर डेटनंतर दोघांचं नातं बहरणार..? नवा प्रोमो व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील दिवाळी सीक्वेन्स दरम्यान एक मोठा ट्विस्ट पहायला मिळाला. अर्जुनने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर बायको सायलीला अतिशय खास गिफ्ट दिले. अर्जुनने दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मधूभाऊ आणि आश्रमातील मुलांना घरी आणून सायलीला चकित केले. अर्जुनचे हे सरप्राईज पाहून सायली अतिशय आनंदी आणि तितकीच भावुक झाली. यानंतर, आपल्याला इतका मोठा आनंद दिल्याबद्दल सायली अर्जुनला डिनर डेटचं सरप्राईज देते. त्यामुळे आता यांचं नातं बहरणार असे वाटू लागले आहे.

कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असूनही अर्जुन आपल्यासाठी एवढं काही करत आहे हे पाहून सायलीच्या मनात परकेपणाची भावना येते. त्यामुळे तिलाही अर्जुनसाठी काहीतरी करायला पाहिजे.. असं वाटू लागतं. यासाठी सायली अर्जुनचा मित्र चैतन्यची मदत घेते आणि डिनर डेट प्लॅन करते. चैतन्यच्या साथीने सायली बेडरुममध्ये साधी पण सुंदर अशी सजावट करून सर्वत्र मेणबत्त्या लावते. दरम्यान अर्जुन कामावरून घरी यायच्या वेळी संपूर्ण खोलीत चैतन्य आणि सायली अंधार करतात. जसा अर्जुन खोलीत पाऊल टाकतो तशी सायली त्याला मेणबत्त्या पेटवून सरप्राईज देते.

सायलीने केलेली हि गोड तयारी आणि डिनर डेट प्लॅनिंग पाहून अर्जुन अगदी भारावून जातो. हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आता प्रेक्षकांमध्ये सायली – अर्जुन एकत्र कशी येणार..? याबाबत उत्सुकता आहे. सायलीने दिलेल्या या गोड सरप्राईजमुळे त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नातं खऱ्या लग्नात बदलेल का..? कि सायली आणि अर्जुनमध्ये असणारा हा परकेपणा असाच कायम राहणार..? हे मालिकेच्या आगामी भागांमध्ये समजेल. सध्या ‘ठरलं तर मग’ हि मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे.