‘गेल्या 8 वर्षांपासून ..’; ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्याने दिली लॉंगटाईम रिलेशनशिपची कबुली


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या मालिकेचे कथानक, मालिकेतील पात्र, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना भावला आणि त्यामुळे हि मालिका टीआरपीच्या रेसमध्ये टॉप १० मध्ये दिसते आहे. सध्या मालिकेत मुक्ता आणि सागरच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. त्यामुळे हि मालिका प्रचंड चर्चेत आली आहे. या मालिकेतील मुक्ता, सागर यांच्यासह माधवी गोखले, इंद्रा कोळी, पुरुषोत्तम गोखले, जयंत कोळी, लकी, मिहीर, कोमल, मिहिका अशी सगळीच पात्र चाहत्यांच्या पसंतीस पडली आहेत. यातील एका अभिनेत्याने मात्र स्वतःची पसंती जाहीर केली आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील एका अभिनेत्याने नुकतीच एका मुलाखतीत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. मुक्ता- सागरच्या लग्न सोहळ्यानिमित्त ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील कलाकार मंडळी वेगवेगळ्या एंटरटेनमेंट चॅनेलसोबत संवाद साधताना दिसत आहेत. या दरम्यान मालिकेतील कलाकार मंडळी केवळ मालिकेबाबत नव्हे तर वैयक्तिक आयुष्याविषयी आणि इतर मजेशीर गोष्टी, शूटिंगचे किस्से सांगताना दिसत आहेत. या दरम्यान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मिहीर हि भूमिका साकारत असलेल्या अभिनेता राजस सुळेने आपण रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली आहे.

एका मुलाखती दरम्यान प्रेमाचे किस्से सांगता सांगता राजने खाया आयुष्यातील प्रेमाची कबुली दिली. तो म्हणाला की, ‘गेल्या आठ वर्षांपासून मी रिलेशनशिपमध्ये आहे’. इतकाच नव्हे तर त्याने यावेळी आपल्या प्रेयसीसोबतच फोटोदेखील दाखवला. त्यामुळे उपस्थित इतर कलाकार त्याला चिडवत म्हणाले कि, ‘तू खूप जणीचं हृदय तोडलं आहेस’. राजस सुळेच्या प्रियसीचे नाव चैत्राली पितळे असून ते गेल्या ८ वर्षांपासून एकमेकांसोबत प्रेमाच्या गोड नात्यात आहेत. सोशल मीडियावर राजस अनेकदा त्याच्या प्रेयसीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो.