सुयश टिळकची ‘ही’ मालिका होणार बंद; प्रेक्षकांना द्यावा लागणार निरोप


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका आणि प्रेक्षक यांचे नाते दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. चित्रपटांइतकेच मालिका देखील मनोरंजनाचे अत्यंत महत्वपूर्ण आणि प्रभावी माध्यम आहे. विविध वाहिनींवरील विविध मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत असताना काही मालिका मात्र सपशेल फसताना दिसतात. अलीकडच्या काळात टीआरपी न मिळाल्याने काही मालिकांनी अक्षरशः माना टाकल्या. तर काही मालिका कथानक पूर्ण झाल्याने निरोप घेताना दिसल्या. अशातच आणखी एक लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समजत आहे.

https://www.instagram.com/p/Cy6bkNGrWKE/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

सन मराठी वाहिनीवरील ‘जाऊ नको दूर… बाबा!!’ या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी ही दुःखद बातमी आहे कि येत्या काही दिवसात हि मालिका निरोप घेणार आहे. या लोकप्रिय मालिकेत काही महिन्यांपूर्वीच प्रसिद्ध अभिनेता सुयश टिळकची एंट्री झाली होती. या मालिकेतून सुयश एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. पण आता या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून येत्या काही आठवड्यात ही मालिका बंद होणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत स्वतः अभिनेता सुयश टिळकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.

‘जाऊ नको दूर..बाबा!’ हि मालिका १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरु झाली होती. गेली दोन वर्ष हि मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आस्ताद काळे, ऋतुजा देशमुख, मयुरी कापडणे, अद्वैत कडणे, स्वप्नाली पाटील अशी तगडी स्टारकास्ट यात पहायला मिळाली. पण आता ही मालिका निरोपाकडे मार्गस्थ झाल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत. मालिकेचे चित्रीकरण आता शेवटच्या टप्प्यात आले असून लवकरच ही मालिका बंद होणार आहे. या संदर्भात ‘मराठी टेली बझ’ने माहिती दिली आहे. ‘जाऊ नको दूर..बाबा!’ या मालिकेच्या वेळेत म्हणजे संध्याकाळी ७:३० वाजता आगामी मालिका ‘नवी जन्मेन मी…’ ही सुरू होणार आहे.