परत आलोय.!! ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील मल्हारची नव्या मालिकेत एंट्री; साकारतोय निगेटिव्ह भूमिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला. या लिपमुळे मालिकेतील बरीच जुनी पात्र प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसली. दरम्यान ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील मल्हार या पात्राची देखील एक्झिट झाली आणि त्यामुळे अभिनेता कपिल होनराव या मालिकेतून बाहेर पडला. त्याने हे पात्र इतकं उत्तम साकारलं होतं कि प्रेक्षकांमध्ये त्याला नव्या भूमिकेत पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती. यानंतर आता प्रेक्षकांचा लाडका मल्हार नव्या मालिकेतून आणि नव्या ढंगाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

याबाबत स्वतः कपिलने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यावेळी कपिल ‘सोनी मराठी’ वाहिनीच्या ‘निवेदिता माझी ताई’ या मालिकेत एका नकारात्मक भूमिकेतून मनोरंजन करतो आहे. यासंदर्भात त्याने नुकतीच अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली आहे.

कपिलने या पोस्टमध्ये त्याचा नव्या भूमिकेतील फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत लिहिलंय कि, ‘परत आलोय तुमचं मनोरंजन करण्यासाठी… 17 नोव्हेंबरला मल्हार म्हणून तुमचा निरोप घेतल्यानंतर. पुढे काय..? हा प्रश्न होताच, आता आपण लिड रोल करावा हीच मनात, इच्छा ठेवून तशी तयारी करत होतो. वर्कआउट, डायट, मराठी डिक्शन आणि स्वतःवर काम करत होतो’.

‘तस एक दोन जागी lead म्हणून फायनल झालो ही होतो. पण काही कारणास्तव ते फायनल नाही होऊ शकल. असो‌‌ तुमच प्रेम आणि पाठिंबा असेल तर एक ना दिवस lead ‌नक्की करेनच आणि सुख मधून निरोप घेतल्यानंतर, तसेच रोल ऑफर होत होते. जवळपास चार- पाच भुमिकेला नाही म्हटल्यावर हा रोल ऑफर झाला. एक निगेटिव्ह भूमिका मी कधीच केली नव्हती. म्हणून ह्या भूमिकेला मी लगेच हो म्हणालो.

मल्हारला प्रेम दिलत तसंच या भूमिकेला पण द्या. तुमच प्रेम असंच सोबत असू द्या आणि बघत रहा निवेदिता माझी ताई’. कपिलच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कपिलची हि नवी मालिका तिच्या एंट्रीमुळे पाहत असल्याचे म्हटले आहे.