‘सुख म्हणजे..’ मालिकेच्या नव्या अध्यायाने रचला नवा विक्रम; अभिनेत्याने मानले प्रेक्षकांचे आभार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला आहे. मालिकेचा टीआरपी घसरतो का काय..? असे वाटत असताना गौरी- जयदीपच्या पुनर्जन्माच्या कथेने मालिकेला पुन्हा चर्चेत आणलं आहे. सध्या या मालिकेचे कथानक एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे. मालिकेत गौरी- जयदीपने नित्या- अधिराज म्हणून पुनर्जन्म घेतला आहे. या नव्या ट्वीस्टला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मालिकेचा टीआरपी चांगलाच वाढला आहे.

दरम्यान, या मालिकेचा वाढत टीआरपी एक इतिहास रचताना दिसतोय. या मालिकेमध्ये जयदीप अर्थात आत्ताच अधिराज साकारणारा अभिनेता मंदार जाधव याने नुकतीच त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक फोटो शेअर करत मालिकेच्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. माहितीनुसार, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका गेल्या ३ वर्षात रात्री प्रसारित होणाऱ्या मालिकांपैकी सर्वाधिक टीआरपी असलेली मालिका ठरली आहे.

याबाबत स्वतः अभिनेता मंदार जाधवने माहिती देणारी पोस्ट शेअर करताना प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. यामध्ये मंदारने लिहिलंय कि, ‘सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार. असच प्रेम करत रहा’. दरम्यान मंदारच्या या पोस्टवर अनेक नेटकरी, मालिकेचे प्रेक्षक आणि कलाकार मंडळींनी कमेंट करताना मालिकेच्या टीमचे अभिनंदन केले आहे. मंदारने शेअर केलेली हि पोस्ट व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतो आहे.