Tharala Tar Mag – सायली- अर्जुनचं नातं नव्याने फुलणार.. पुन्हा एकदा लग्न करणार; मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Tharala Tar Mag) स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. अगदी अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. इतकेच नव्हे तर टीआरपीच्या रेसमध्ये हि मालिका टॉप १० मध्ये आहे. सध्या मालिकेच्या कथानकानुसार, सायलीवर हल्ला झाल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. महिपतने पाठवलेल्या गुंडानी गणपती विसर्जन मिरवणुकीत सायलीवर हल्ला केला. यानंतर अर्जुनने तिला रुग्णालयात नेले. या सिक्वेंसदरम्यान अर्जुन आणि सायलीतील नात्याने नवे वळण घेतले आहे.

रुग्णालयात प्रतिमाने सायलीला रक्त दिल्याने ती बचावते. सोमवारच्या भागात सायली शुद्धीवर आली आणि आता अर्जुन त्याच्या मनातील भावना व्यक्त करताना दाखवण्यात येणार आहे. यापुढे १५ ऑक्टोबरला विशेष भागात सायली पूर्णपणे बरी होऊन सुभेदारांच्या घरी परतल्याचं पहायला मिळेल. (Tharala Tar Mag) घरी आल्यावर अर्जुनच्या वागण्यातील बदल सायलीला जाणवेल. यामुळे सायली- अर्जुनचं नातं हळुहळू बहरतं जाईल. अर्जुनला सायलीबद्दल प्रेम निर्माण झाल्यावर त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट लग्नाच्या बॉण्डचं भविष्यात काय होणार हे आता पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

माहितीनुसार, महाएपिसोडमध्ये मालिका नवे वळण घेईल. कॉन्ट्रॅक्ट लग्नाच्या बॉण्डमुळे अर्जुन- सायलीने मंदिरात लग्न केले होते. ज्यामुळे त्यांच्या लग्नाला सुभेदार कुटुंबीयांपैकी कोणीच नव्हतं. मात्र आता येत्या विशेष भागात पूर्णा आजी अर्जुनला ‘तुझं लग्न मला पाहता आलं नाही’ असा टोमणा मारते आणि मग अर्जुन ताबडतोब सायलीचा हात धरून सुभेदार कुटुंबीयांसमोर सप्तपदी घेऊन तिला मंगळसूत्र घालतो. (Tharala Tar Mag) अशाप्रकारे त्यांचे पुन्हा एकदा लग्न होताना दिसेल. अर्जुनच्या पुन्हा लग्न करण्याच्या निर्णयामुळे प्रिया, अस्मिता आणि घरातील इतर मंडळी मात्र धक्क्यात जाताना दिसतील.