‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या कलाकारांचा सिद्धूसोबत धिंगाणा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ हि मालिका टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल स्थानावर आहे. मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्यांची जोडी, मालिकेचे कथानक आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. तर अलीकडेच सुरु झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका या मालिकेला टीआरपीत चांगली टक्कर देताना दिसत आहे. अशातच या दोन्ही मालिका ‘
आता होऊदे धिंगाणा’च्या मंचावर एकमेकांना भिडल्या आणि इथेही ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या कलाकारांनी बाजी मारली.

संगीत, मस्ती, गप्पा, धमाल आणि धिंगाणा यांचा मेळ असलेला ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाचे दुसरे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या कार्यक्रमाचा होस्ट प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात ‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील कलाकारांमध्ये सांगितिक लढत पहायला मिळाली. पहिल्या पर्वाप्रमाणे या दुसऱ्या पर्वातसुद्धा धून टाक, बोबडी वळाली, रेखाटा पटापट, साडे माडे शिंतोडे या चार फेऱ्या आहेत. या चार फेऱ्यांपैकी तीन फेऱ्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने जिंकल्या. त्यामुळे त्यांना घंटाघरात जाण्याची संधी देण्यात आली.

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीममधून महिपत (मयूर खांडगे) घंटाघरात गेला आणि त्याने १० हजार रुपये आणले. यानंतर अस्मिताने (मोनिका दबडे) ५० हजार आणि अर्जुनने (अमित भानुशाली) १०४ रुपये आणले. पुढे ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेच्या टीमला देखील घंटाघरात जाण्याची संधी देण्यात आली.

तर या मालिकेच्या टीममधून माधवी (शुभांगी गोखले) या घंटाघरात गेल्या आणि येताना शून्य घेऊन आल्या. त्यामुळे ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या दुसऱ्या पर्वातील पहिल्या भागात ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या टीमला हरवून ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या कलाकारांनी बाजी मारली.