आनंदी आनंद..!! स्वानंदी- आशिषचं लग्न कधी होणार..? उदय टिकेकरांनी दिली महत्वाची माहिती


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा झाला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मिडियासाठी आकर्षण ठरले. आता स्वानंदी आणि आशिष यांचं लग्न कधी होणार…? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. दरम्यान त्यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली असून त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. स्वानंदीचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेता उदय टिकेकर यांनी लग्नाच्या मुहूर्तासंदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

स्वानंदी आणि आशिषच्या साखरपुड्यानंतर तिच्या लग्नाबाबत जाणून घेण्याची चाहत्यांमधील उत्सुकता प्रचंड वाढली आहे. त्यामूळे उदय टीकेकर यांनी स्वानंदी आणि आशिष यांचे लग्न कधी व कुठे होणार याची अपडेट दिली आहे. उदय टिकेकरांनी सांगितल्याप्रमाणे, येत्या डिसेंबरमध्ये स्वानंदी- आशिष विवाहबद्ध होणार आहेत. तसेच दोघेही पुण्याचे असल्यामुळे लग्न पुण्यातच होणार आहे. यावेळी उदय टिकेकर असंही म्हणाले कि, ‘मुलीचं लग्न हे तिच्या पालकांचे स्वप्न असते. त्यामुळे ती लग्न करून जाणार या विचाराने कितीही काळीज भावनिक झालं तरीही स्वतःला सावरायचं’.

याच कारण असं कि, ‘आम्ही तिघेही आतापर्यंत कामामूळे एकमेकांपासून दूर राहिलोय. देवाची कृपा आहे की स्वानंदी चांगल्या कुटुंबात जाणार आहे. तिला चांगला मुलगा मिळाला आहे. त्यांनाही चांगली मुलगी मिळाली आहे. त्यामुळे मी त्यांच्या लग्नाचा आनंद साजरा करणार आहे. तिला तिच्या घरी पाठवताना भावनिक होणार नाही’. तर वधूपिता उदय टीकेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वानंदी आणि आशिष हे डिसेंबर २०२३ मध्ये पुणे येथे एकमेकांसोबत सात जन्माची गाठ बांधणार आहेत. शिवाय टिकेकर आणि कुलकर्णी या दोन्ही लग्न घरांमध्ये जोरदार तयारी सुरु झाली आहे.